देशाच्या दैवताचा अवमान खपवून घेणार नाही, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगे यांचा इशारा

देशाच्या दैवताचा अवमान खपवून घेणार नाही, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगे यांचा इशारा

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याचे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्याच्या घटनेने देशात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासह पूर्ण देशाचे दैवत आहे. देशाच्या दैवताचा अवमान खापवून घेणार नाही. सरकारला याचे परिमाम भोगावेच लागलीत, अशा इशारा मराठा आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी थेट महायुती सरकारला दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हा एक अपघात आहे. कदाचित वाईटातून काहीतरी चांगले घडायचे असेल, त्यामुळे हा अपघात घडला असेल, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. त्यांच्या या विधानावरही जरांगे यांनी केसरकर आणि सरकारवर निशाणा साधला. मनोज जरांगे म्हणाले की, ते तर खूप हुशार आहेत. त्यांना काय बोलावे हे कळत नसावे, एका मंत्र्यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे बोलणं म्हणजे अवघड आहे. केसरकर यांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपचे सरकार जाते, असा त्यांचा रोख असावा, असा जबरदस्त टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.

छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला, याची सखोल चौकशी करून दोषींना तुरुंगात टाका. कायद्याची जरब एवढी बसली पाहिजे की, कुठल्याही महापुरुषाचा अवमान करण्यापूर्वी त्याने दहा वेळा विचार केला पहिजे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे फार वेदनादायक आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून तातडीने याची चौकशी करा, अन्यथा याचे सखोल परीणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;