सलमान खान असताना आमिर कधीच नाही करु शकत तिसरं लग्न? कारण…

सलमान खान असताना आमिर कधीच नाही करु शकत तिसरं लग्न? कारण…

अभिनेता आमिर खान त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. पण अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. अभिनेता लवकरच ‘सितारे जमीन पर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या आमिर त्याच्या आगामी सिनेमामुळे तर चर्चेत आहेच, पण नुकताच झालेल्या एका पॉटकास्ट शोमध्ये अभिनेत्याने तिसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं. आमिर खान याने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या ‘चॅप्टर 2’ या पॉडकास्टमध्ये स्वतःच्या तिसऱ्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं. पण अभिनेता सलमान खान असताना आमिर खान याचं तिसरं लग्न कधीच होऊ शकत नाही.

‘मी असताना आमिर खानचं तिसरं लग्न कधीच होऊ शकत नाही…’ असं खुद्द सलमान खान एका जुन्या मुलाखतीत म्हणाला होता. सांगायचं झालं तर, सलमान खान आणि आमिर खान चांगले मित्र आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

2017 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत आमिर खान याने सलमानच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सलमान खान याचे हात – पाय बांधून त्याला सप्तपदी घ्यायला लावेल…’ असं वक्तव्य आमिर खान याने केलं होतं. तर आमिर खानच्या या वक्तव्यावर सलमान खानने देखील प्रतिक्रिया दिली होती.

रिपोर्टनुसार, सलमान खान 2017 मध्ये म्हणाला होता की, ‘हो मी एका ठिकाणी वाचलं होतं, मी लग्न करावं अशी आमिरची इच्छा आहे. त्यासाठी तो माझे हात-पाय बांधेल. पण मी फक्त एवढंच सांगेल की, मी त्याचे हात – पाय बांधेल म्हणजे आमिर तिसरं लग्न करणार नाही…’ असं सलमान खान म्हणाला होता.

तिसऱ्या लग्नाबद्दल आमिर खानचं वक्तव्य

रिया हिने आमिर खान याला तिसरं लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, ‘आता मी 59 वर्षांचा आहे… मला नाही वाटत की मी आता तिसरं लग्न करेल. मला कठीण वाटत आहे. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या जवळ आलो आहे… मला माझी भावंड, मुलं आहेत. त्यांच्यासोबत मी फार आनंदी आहे… एक उत्तम व्यक्ती होण्याचा आता मी प्रयत्न करत आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न 18 एप्रिल 1986 मध्ये रिना दत्ता हिच्यासोबत झालं. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्याने 2005 मध्ये किरण राव सोबत लग्न केलं. पण अभिनेत्याचं दुसरं देखील टिकलं नाही. 2021 मध्ये आमिर – किरण यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोट झाला असला तरी अभिनेता दोन्ही कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;