सरकारला तारतम्य राहिलेलं नाही, शरद पवार यांची महायुती सरकारवर सडकून टीका

सरकारला तारतम्य राहिलेलं नाही, शरद पवार यांची महायुती सरकारवर सडकून टीका

मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यावरून राज्य सरकारला कुठलेही तारतम्य उरलेले नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.

मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तेव्हा शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात कुठेही पुतळा उभारायचा असेल तर महाराष्ट्र सरकारची परवानगी लागते. तिथे स्वतः पंतप्रधान गेले होते. यात आम्ही कुठलेही राजकारण आणत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रांझ्याच्या पाटलाने एका मुलीवर अत्याचार केले होते. ही तक्रार जेव्हा शिवाजी महाराजांकडे आली तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचे दोन्ही हात, पाय कापले होते. आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांबाबात आपली निती काय आहे हे संपूर्ण जनतेला त्यांनी दाखवून दिले. एका भगिनीला त्रास दिला त्यावर त्यांनी सक्त निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्या राजाची प्रतिकृती समुद्रावर तयार केली. आणि ती करण्यात जो भ्रष्टाचार झाला, त्यामुळे आज ती मूर्ती उद्ध्वस्त झाली. ज्या ठिकाणी पंतप्रधान स्वतः जाऊन आले, त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले, त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे, असे पवार म्हणाले. तसेच भ्रष्टाचाराविरोधात कुठलीही भूमिका घेऊ नये याचे तारतम्यही या सरकारला राहिलेले नाही. त्यामुळे आमची भूमिका काय आहे? यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतल्याचे शरद पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;