मुंबईकरांची जीवनवाहिनी की मृत्यूवाहिनी? लोकल मार्गावर 20 वर्षांत 23 हजार प्रवाशांचा बळी

मुंबईकरांची जीवनवाहिनी की मृत्यूवाहिनी? लोकल मार्गावर 20 वर्षांत 23 हजार प्रवाशांचा बळी

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर 20 वर्षांत 23 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच विविध अपघातांत 26 हजार 572 प्रवासी जखमी झाले. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात ही धक्कादायक आकडेवारी नमूद केली आहे.

मुंबईच्या लोकल मार्गावरील भीषण परिस्थितीकडे लक्ष वेधत यतीन जाधव यांनी जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर जूनमध्ये सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने प्रवासी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच पश्चिम, मध्य व हार्बर लाईनवरील सर्व स्थानकांच्या आवारातील सुविधा, तेथील अपघात, त्यात होणारे मृत्यू या सर्व बाबींचा सखोल आढावा घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील प्रधान सचिव सुरक्षा आयुक्तांना सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त संतोष कुमार सिंग राठोड यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई

रेल्वे रूळ ओलांडणारे, फूटबोर्डवर उभे राहणारे, अशा प्रवाशांवर कारवाई केली जाते. रेल्वे रुळाजवळील विघातक कृतींना आळा घातला जातो. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी  घेतली जाते. सहाव्या मार्गिकेसारख्या अजून काही उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही रेल्वेने न्यायालयाला सांगितले.

आधीचे आदेश कागदावरच

लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदला. आसनांची रुंदी कमी करा. शक्य असल्यास काही आसने काढून टाका, जेणेकरून अधिकाधिक प्रवासी उभे राहू शकतील, अशी सूचना न्या. नरेश पाटील यांनी केली होती. न्या. पाटील हे निवृत्त झाले, मात्र या सूचनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. काही प्रमाणातच या सूचनांचे पालन झाले. तरीही गर्दी कमी झाली नसल्याचे अ‍ॅड. गीतांजली घोलतकर यांनी सांगितले.

अपघात रोखण्यासाठी शाळा, कॉलेज, बँकांच्या वेळा बदला 

रेल्वे अपघात रोखायचे असल्यास शाळा, कॉलेज, बँकांच्या कामाच्या वेळा बदला, अशी विनंती पश्चिम रेल्वेने उच्च न्यायालयाला केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला आदेश द्यावेत. आम्ही अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना व जनजागृती करतो, पण प्रवाशांच्या सहकार्याशिवाय आमच्या प्रयत्नांना यश येत नाही, अपघात रोखण्यात अडचणी येतात. सकाळी 11 ते रात्री 9 वाजपर्यंत लोकलला प्रचंड गर्दी असते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो. लोकल वेळेवर सोडतो. रेल्वे रूळ ओलांडून कोणी लोकल पकडू नये यासाठी जनजागृती करतो. तरीही गर्दी होतेच. ही गर्दी रोखण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलणे हा पर्याय असू शकतो, असे रेल्वेने न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;