भूमिपूजनाचा नारळ फुटला तरी ठाणे-बोरिवली भुयारी मार्गात काटे

भूमिपूजनाचा नारळ फुटला तरी ठाणे-बोरिवली भुयारी मार्गात काटे

ठाणे आणि बोरिवलीला जोडणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या भुयारी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे. मिंधे सरकारने गाजावाजा करत 13 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडला. मात्र प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भूसंपादन, अतिक्रमण हटवणे, वृक्षप्राधिकरणाच्या परवानग्याच घेतल्या नाहीत. या प्रलंबित परवानग्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गात काटे बनले आहेत.

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग असणार आहे. एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येणाऱ्या या मार्गासाठी 16 हजार 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केवळ शाब्बासकीची थाप मिळवण्यासाठी मिंधे सरकारने घाईगडबडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले. मात्र या भुयारी प्रकल्पासाठी लागणाऱ्या कोणत्याच परवानग्या मिळवल्या नाहीत. अखेर या बोगद्याच्या निर्मितीसाठी काटे बनून उभ्या राहिलेल्या या अडचणी दूर करण्यासाठी एमएमआरडीए आणि बांधकाम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्या सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर पालिका आयुक्तांनी बैठकीत उपस्थित असलेले अधिकाऱ्यांना सूचना देत प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आढावा बैठकीदरम्यान महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष बांधकाम स्थळाला भेट देऊन पाहणी करून परवानगीबद्दलचे विषय मार्गी लावतील, असे आश्वासन यावेळी संबंधित विभागाला दिले. त्यात जलवाहिनी स्थलांतर, उद्यानासाठी वेगळे प्रवेशद्वार आणि विविध परवानग्या सोडवल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी दररोज पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी महापालिकेच्या एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचनादेखील यावेळी आयुक्त राव यांनी यावेळी दिल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;