शेतकरी आंदोलनादरम्यानच अनेक हत्या आणि बलात्कार झाले; कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

शेतकरी आंदोलनादरम्यानच अनेक हत्या आणि बलात्कार झाले; कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

भाजप खासदार कंगाना रणौत नेहमी वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत असते. याआधी तिने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद झाला होता. आता पुन्हा एकदा तिने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या विधानाने वाद पेटण्याची शक्यता आहे. देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच राज्यात घडलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे जनमानसात प्रंचड रोष आहे. त्यातच कंगनाने केलल्या विधानाने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनादरम्यानच अनेक हत्या आणि बलात्कार झाल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या या वक्तव्याबाबत सर्व सत्रातून संताप व्यक्त होत आहे.

शेतकरी त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आणि शेतमालाला हमी भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरले होते. सरकारने त्यांचे दिल्लीत येण्याचे रस्ते बंद केले होते. त्यांच्या रस्त्यात खिळे टाकण्यात आले होते. त्यांच्यावर गोळीबारही करण्यात आला होता. ही परिस्थिती देशाला माहिती आहे. तरीही कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ती म्हणाली की, शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देशाने बिघतले आहे. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, अनेक बलात्कार झाले. सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती, असा विधान तिने केले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हे वक्तव्य केले आहे.

सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया, धर्मांतर करणाऱ्या टोळ्या आणि फुटीरतावादी खलिस्तान समर्थक फोफावत आहेत. तिथे काही लोक नेहमीच कायदा हातात घेत आहेत, हे योग्य नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझ्यावर हल्ला करुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ती म्हणाली. महिलांची सुरक्षा हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मी महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवते, असेही तिने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;