शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपुर्वी कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम

शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपुर्वी कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम

सरकारने शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपुर्वी कर्जमुक्त करावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही कर्जमुक्ती कशी होत नाही, हेच पाहतो, असा इशाराही जरांगे यांनी राज्य सरकारला दिला. सरकारने 30 सप्टेंबरपुर्वी शेतकऱ्यांची कायमची कर्जमुक्ती करावी, सगळा पिकविमा, अनुदान द्यावे. आता शेतकऱ्यांच्या पिकाला भाव कसा मिळत नाही हे आम्ही बघतो, असेही जरांगे म्हणाले.

आता आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न हाती घेतला आहे. शेतकरी म्हणजे आपणच, आपण अजून किती दिवस फसायचं, आम्हाला कर्जमाफी नको कर्जमुक्ती करा कायमची. कर्जमुक्ती केल्यानंतर कर्जही देऊ नका. शेतकऱ्यांना ज्या सुविधा लागतात त्या द्या. कायमची वीज द्या, पाण्याची सुविधा करा, अशी मागणीही जरांगे यांनी केली. शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या होणारच नाहीत, असेही जरांगे म्हणाले.

पिक विमा भरल्यावरही शेतकऱ्यांना तो मिळत नाही. सरकारचा या कंपन्यांवर धाक नाही. सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या कंपन्याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत, असा इशाराही जरांगे यांनी दिला. सरकार म्हणते कंपन्या बाहेरच्या आहेत. त्या कंपन्या देशाबाहेरच्या आहेत का ? तुम्हाला तिकडे जाता येत नाही काय? शेतकऱ्यांना अजून किती फसवणार, असे सवाल करत जरांगे यांनी सरकारवरही हल्लाबोल केला.

आगामी विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनोज जरांगे यांनी संकेत दिले आहेत. याबाबतच्या आवाहनानंतर इच्छुकांचे 700 ते 800 अर्ज आले आहेत. त्यांची छाननी सुरू आहे, आणखी काही इच्छुक भेट आहेत, असेही जरांगे म्हणाले. ही गोरगरीब समाजाची लढाई आहे. जातीधर्माच्या विरोधात ज्यांनी काम केलं, त्यांना पश्चाताप होत आहे. मराठ्यांच्या मताशिवाय कोणताही पक्ष निवडून येऊ शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे, असेही जरांगे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;