‘महाराष्ट्र बंद’ रोखण्यासाठी मिंधे सरकारचा यंत्रणांवर दबाव, मूक आंदोलनही चिरडण्यासाठी पोलिसांवर दडपण

‘महाराष्ट्र बंद’ रोखण्यासाठी मिंधे सरकारचा यंत्रणांवर दबाव, मूक आंदोलनही चिरडण्यासाठी पोलिसांवर दडपण

महाविकास आघाडीचा ‘महाराष्ट्र बंद’ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठरणार या भीतीने मिंधे सरकारने गुरुवारपासूनच पोलीस आणि प्रशासनावर प्रचंड दबाव आणला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पळापळ सुरू होती. बैठकांवर बैठका घेतल्या जात होत्या. न्यायालयाने बंदला मनाई केल्यानंतरही महाविकास आघाडी मूक आंदोलन करणार असल्याने मिंध्यांचे टेन्शन अधिकच वाढले आहे. ते आंदोलनही दडपण्यासाठी त्यांनी पोलिसांवर दडपण आणल्याचे समजते.

महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली तेव्हापासूनच मिंधे सरकारचे धाबे दणाणले होते. बदलापूरच्या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करून राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सरकारचा निषेध नोंदवला होता. सोशल मीडियावरूनही सरकारची छी-थू होत होती. त्यातच महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी झाला तर आपले काही खरे नाही याची जाणीव मिंधे सरकारला झाली होती. त्यासाठी बंदविरुद्ध सरकारच्या हालचाली सुरू होत्या.

महाविकास आघाडीच्या प्रस्तावित बंदला जनतेतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विविध पक्ष आणि संघटनांकडून मिळणारा पाठिंबा यामुळे मिंधे सरकार चिंतेत पडले होते. त्यामुळेच त्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना उचकावून बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करायला लावली, अशी चर्चा सुरू आहे. न्यायालयाने बंदला मनाई केल्यानंतरही महाविकास आघाडीने मूक आंदोलनाचा मार्ग पत्करल्याने सरकारची चिंता कायम आहे. ते कसे रोखायचे यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि गृहमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या असे समजते.

शिवसैनिकांना नोटिसा

बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठकही बोलवली होती. पोलीस यंत्रणेवर सरकारने प्रचंड दबाव आणला होता. त्यामुळे पोलिसांनी आज सकाळपासूनच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. अनेकांच्या घरांवर पोलिसांनी धाडी घातल्या. हजारो कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या गेल्या. कार्यकर्त्यांना पकडून पोलीस ठाण्यांमध्ये पुढील 48 तास बसवून ठेवा, असे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;