थोडी शरम असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपल्या अकार्यक्षमतेचे अजून किती पुरावे देणार; अंबादास दानवे यांचा घणाघात

थोडी शरम असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपल्या अकार्यक्षमतेचे अजून किती पुरावे देणार; अंबादास दानवे यांचा घणाघात

जर थोडी शरम असेल, तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकायला हवा. आपल्या कार्यक्षमतेचे अजून किती पुरावे देणार आहात? असा रोखठोक सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. उरण, नवी मुंबई, बदलापूर, अकोला आणि मुंबईनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. करवीर तालुक्यातील शिये गावात एका 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयीपण हत्या करण्यात आली. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

कोल्हापुरात घडलेल्या घटनेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट (X) करत मुख्यंमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “कोल्हापूरातील राजघराण्याने कधी काळी पोलीस, महिला आणि मुलांना सन्मानाने जगता यावे म्हणून मानवतेला प्राथमिकता दिली. त्याचा सन्मान म्हणून पंतप्रधान मोदी पोलंडमध्ये जाऊन स्मारकाला नमन करतात आणि इकडे त्यांच्या चेल्यांच्या राज्यात 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार होतो आणि तिची हत्याही होते.” असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“राज्यकर्ते महिलांना सुरक्षा प्रदान करू शकत नसतील तर त्यांनी खात्यात टाकलेले 1500 रुपये काय उपयोगाचे? विशेष म्हणजे कोल्हापुरात ही घटना उघडकीस येत असताना मुख्यमंत्री ‘लाडक्या बहिणीं’वर फुलांची उधळण करत होते, ते ही कोल्हापूरातच. या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून अगदी थोड्या अंतरावर असलेल्या गावात ही घटना घडली आहे. आता थोडी शरम असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकायला हवा. आपल्या अकार्यक्षमतेचे अजून किती पुरावे देणार आहात?” असा बोचरा सवाल अंबदास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;