Kangana Ranaut: अशा मुली पुरुषांना बिलकूल आवडत नाहीत…, कंगना रनौतचं खळबळजनक वक्तव्य

Kangana Ranaut:  अशा मुली पुरुषांना बिलकूल आवडत नाहीत…, कंगना रनौतचं खळबळजनक वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील कंगना यांना विचारण्यात आलं की, पुरुषांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी महिलांसाठी धोकादायक ठरु शकते. यावर कंगना म्हणाल्या, ‘कोणत्याही रिलेशनशिपमध्ये दोन्ही बाजूने संतूलन असणं फार महत्त्वाचं आहे… अनेक नाती मोडतील जेव्हा महिला नात्यामध्ये स्वतःचं बलिदान देणं सोडतील…’ असं कंगना रानौत म्हणाल्या. शिवाय पुरुशांना कशा मुली अवडतात आणि कशा मुली आवडत नाहीत… याबद्दल देखील कंगना यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र कंगना रनौत यांची चर्चा रंगली आहे.

कंगना रनौत म्हणाल्या, ‘जर तुम्हीच सतत नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, हा सर्वात मोठा रेड फ्लॅग आहे. समोरच्या व्यक्तीचं नात्यात 40 टक्के आणि तुमचं 60 टक्के योगदान असेल तरी नातं जास्त काळ टिकणार नाही… जर तुम्ही अधिक इमानदार, प्रामाणिक आहात तर तुमच्यामध्ये कधीच संतूलन राहणार नाही…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

पुढे मुलींसाठी कंगना म्हणाल्या, ‘दुसरा रेड फ्लॅग मुलींसाठी आहे…. कदाचित मुलींना विश्वास देखील बसणार नाही, पण यामध्ये तथ्य आहे. काही फरक नाही पडत तुम्ही किती स्मार्ट, किती यशस्वी आहात… पण एका पुरुषाला त्याच्यापेक्षा अधिक स्मार्ट आणि यशस्वी स्त्री आवडत नाही. मी अनेकांच्या नात्यातील वाद पाहिले आहेत. त्यामुळे मी सांगू शकते. काही पुरुषांमध्ये मेल इगो नसू शकतो… पण अनेक पुरुषांना स्वतःपेक्षा स्मार्ट आणि यशस्वी मुली आवडत नाहीत…’ असं देखील कंगना म्हणाली.

लग्न अधिक काळ टिकून राहतात कारण महिला स्वतःचं नात्यात बलिदान देतात… पण जेव्हा कंगनाला पुरुष महिलांपेक्षा अधिक स्मार्ट नसेल तर असे पुरुष महिलांना अवडत नाहीत? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘कमी स्मार्ट आणि यशस्वी पुरुष महिलांचा चांगला मित्र होऊ शकतो पण जोडीदार नाही… एका पुरुषाला आदर मिळवण्यासाठी महिलांपेक्षा अधिक यशस्वी होण्याची गरज आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

कंगना रनौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर राजकारणाकडे स्वतःचा मोर्चा वळवला. कंगना पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि विजय मिळवला. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून कंगना यांचा विजय झाला आहे. आता कंगना बॉलिवूड करियर आणि राजकारणात पूर्ण व्यस्त आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;