लाडकी बहीण योजना बंद करू अशी भीती का वाटतेय? संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल

लाडकी बहीण योजना बंद करू अशी भीती का वाटतेय? संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शेवटच्या काळात पेशव्यांचे राज्य पुण्यात ज्या पद्धतीने सुरू होते त्याच पद्धतीने फडणवीस व त्यांचे लोक काम करीत आहेत. अनागोंदी, अराजक, लुटमार हे सर्व हे घाशीराम कोतवाल करीत आहेत, असा आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करून अशी त्यांना की भीती वाटते, असा सवालही त्यांनी केला.

शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी उद्या, रविवारी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संजय राऊत आज नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

लाडकी बहीण योजनेत विरोधकांकडून खोडा घातला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता त्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात की वन नेशन वन इलेक्शन. पण चार राज्यांतल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्र या फक्त चार राज्यांच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही आणि वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करीत आहेत. हे खोटारडे लोक जनतेला मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा असल्याची टीकाही त्यांनी केली.

नरेंद्र मोदी यांनी नाव बदलून काँग्रेसच्या योजना चालवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी काहीही केले नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या, गरीब, संरक्षण, सामाजिक न्याय अशा बाबतीत काँग्रेसच्या वर्षानुवर्षे योजना होत्या, पण मोदींनी फक्त नावे बदलली, योजना त्याच आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली असल्याचे ते म्हणाले.

दीड हजाराऐवजी तीन हजार

लाडकी बहीण योजना हा सत्ताधाऱ्यांसाठी टर्निंग पॉइंट नाही असे सांगून संजय राऊत म्हणाले की, महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वीही आलेल्या आहेत. ते दीड हजार रुपये काही खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला हा पैसा आहे. या योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. आमचे सरकार येईल तेव्हा पंधराशेऐवजी आम्ही तीन हजार रुपये करू हा आमचा शब्द असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;