चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत आणि वन नेशन वन इलेक्शनच्या बाता काय मारता? पवारांचा हल्ला

चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत आणि वन नेशन वन इलेक्शनच्या बाता काय मारता? पवारांचा हल्ला

देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य उरले नाही. चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आणि ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या बाता काय मारता? म्हटल्याप्रमाणे एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असा हल्ला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर केला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना सबंध देशाच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी भूमिका मांडली. ती भूमिका मांडून 12 तास होत नाहीत तोवरच जम्मू-कश्मीर आणि हरियाणात निवडणूक जाहीर झाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान ‘वन नेशन वन इलेक्शन’ची भूमिका मांडत असताना महाराष्ट्र व झारखंडमध्ये निवडणूक जाहीर केली नाही. हे म्हणजे पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगाच्या धोरणात विसंगती दिसत आहे, असे शरद पवार म्हणाले.

पवार पुढे  म्हणाले, शासनाचे धोरण, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल; मात्र आज शांतता आणि सौहार्द  जास्त महत्त्वाचे वाटते, म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल याबाबत मी अधिक आग्रही आहे. अन्य काही देशात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन संकटात येईल असे काही करू नये हे माझे आवाहन आहे.

बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले. सत्ता परिवर्तनासाठी तिथे उठाव झाला. त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी घडलेल्या घटना राज्याच्या आणि समाजाच्या हिताच्या नाहीत. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारणात तसेच समाजकारणात वावरणाऱ्यांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि काही घडणार नाही याबद्दलची खबरदारी घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;