Anil Deshmukh News – दंगलींचा कट रचला जातोय का? अनिल देशमुखांनी व्यक्त केला संशय
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी केली. तसेच राज्यात भाजप सरकार दंगली घडवू शकतात असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला होता असेही देशमुख म्हणाले.
जळगाव, नाशिकमध्ये मोर्चाला हिंसक वळण लागले होते. बांगलादेशच्या हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात सकल हिंदू समाजाने बंद पुकारला होता. तेव्हा या मोर्चाला हिंसक वळण लागले होते.
यावर अनिल देशमुख म्हणाले की, भाजप सरकार कधीही दंगली घडवू शकतात असा अंदाज शरद पवारांनी व्यक केला होता,नाशिक आणि संभाजीनगरात दंगली झाल्या, हा त्याच कटाचा भाग आहे का? असा सवाल देशमुखांनी विचारला. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे ही प्राथमिकता गृहखात्याची आहे असेही देशमुख म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List