महाराष्ट्राची एकजूट महायुतीला पराभूत करू शकते – आदित्य ठाकरे

महाराष्ट्राची एकजूट महायुतीला पराभूत करू शकते – आदित्य ठाकरे

लोकसभेत महाविकास आघाडीने जिंकून दाखवले, आता विधानसभेतही महाराष्ट्राची हीच एकजूट घटनाबाह्य, भ्रष्ट महायुतीला पराभूत करू शकते, असा विश्वास यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पुढच्या काळात आपल्यात भांडणे लावण्याची कामे होतील, पण आपण वेगळे होऊन चालणार नाही, भारतीय जनता पक्ष फक्त एकजूट आणि सत्याला घाबरतो, त्यामुळे हीच ताकद विधानसभेत दिसून आली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

400 पारचा नारा देणाऱया भारतीय जनता पक्षाला देशातील जनतेने 303 वरून 240 वर आणले. आज भाजपचे बहुमताचे सरकार असते तर त्यांनी एका महिन्यात देशाचे संविधान बदलून स्वतःच्या पक्षाचे संविधान देशावर लादले असते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपवाले संविधान बदलणार होते हे फेक नरेटिव्ह नव्हते, तर त्याची प्रक्रिया महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून सुरू झाली होती. भाजपने पक्ष आणि चिन्हे चोरून घटनाबाह्य सरकार स्थापन करून घटनेचा अवमान केला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपचे हे कारस्थान महाविकास आघाडीने जनतेपर्यंत पोहोचवले होते, असे ते म्हणाले.

मिंधे सरकार होर्डिंगवर कामे दाखवतेय, ती खरी असतील तर मग निवडणुका का घेत नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. अनेक महानगरपालिकांवर प्रशासक बसवून त्यांच्या माध्यमातून महायुतीने गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र आणि मुंबईची लूट केली, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

मिंधे सरकारने महाराष्ट्रात एकही उद्योग आणला नाही, फक्त 40 चोरांना खोके आणि नोकऱया मिळाल्या आणि राज्यातील तरुण मात्र बेरोजगार आहेत. पोलीस भरतीसाठी 17 लाख तरुण मुंबईत आले, पण नोकऱया कुठे आहेत? पोलिसांच्या घरांसाठीही या सरकारने काहीच निधी दिलेला नाही. लाडका कॉण्ट्रक्टर आणि लाडके राज्य याच योजना मिंधे सरकारने राबवल्या, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;