शासन आपल्या दारी.. शेतकरी सरकारी कार्यालयांचे खेटे मारी;मंत्र्यांच्या दिलेल्या प्रशासकीय मंजुरीच्या पत्राला केराची टोपली

शासन आपल्या दारी.. शेतकरी सरकारी कार्यालयांचे खेटे मारी;मंत्र्यांच्या दिलेल्या प्रशासकीय मंजुरीच्या पत्राला केराची टोपली

केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तळा तालुक्यात मोठा गाजावाजा करत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम घेण्यात आला. या शासकीय कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे अनुदान मिळाल्याचे पत्र देण्यात आले. तालुक्यातील दहा लाभार्थी शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्यासाठी जाहीर झालेले अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेले नाही. लाभार्थी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारत असूनही त्यांच्या खात्यात दमडीही जमा झालेली नाही. महिला बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रशासकीय मंजुरीच्या पत्राला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे

रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांच्या गोठ्यांचे बांधकाम करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी या शेतकऱ्यांना प्रशासकीय मंजुरीचे पत्र दिले. यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांनी गोठे बांधले. मात्र पाच महिने होऊन गेले तरी दमडीही त्यांच्या पदरात पडली नाही. पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारून शेतकरी रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांच्या बांधकाम करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी या शेतकऱ्यांना प्रशासकीय मंजुरीचे पत्र दिले. यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांनी गोठे बांधले. मात्र पाच महिने होऊन बेजार झाले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम केवळ दिखावा असून लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर कोणताही वचक राहिला नसल्याचा संताप लाभार्थी शेतकरी व्यक्त करत आहेत.

 

शेतकऱ्यांच्या माथी कर्जाचा बोजा

तळा पंचायत समितीने रोजगार हमी योजनेंतर्गत नागाव येथील गंगाराम साळवी, गंगाराम कोळी, गोपाळ जाधव, जानू जाधव, पांडू कोळी, गंगाराम पिंगळे, संतोष शिंदे, लक्ष्मण साळवी, विनायक खराडे आणि बाळाराम राणे या शेतकऱ्यांना जनावरांचे गोठे मंजूर केले. गुरांचा गोठा बांधण्यासाठी १ लाख ८० हजार तर बकऱ्यांच्या शेडसाठी १ लाख ५८ हजार रुपये अनुदान मिळणार होते. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बांधकाम केले आहे. मात्र पाच महिने झाले तरी त्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांवर कर्ज आणि व्याजाचा बोजा वाढत आहे.

•आसन आपल्या द्वारी आणि भिकारी’ अशी शासनाने आमची अवस्था केली आहे. भरपावसात आमची जनावरे भिजत आहेत. मंत्री अदिती तटकरे यांचा कोणताही अंकुश प्रशासनावर नसल्याने आमचे अनुदान रखडले आहे. प्रशासनाने तातडीने अनुदान दिले नाही तर उपोषण करावे लागेल.

■ गंगाराम साळवी, लाभार्थी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;