पनवेलमधील प्रदूषणाचा प्रश्न पोहोचला हायकोर्टात

पनवेलमधील प्रदूषणाचा प्रश्न पोहोचला हायकोर्टात

पनवेलच्या विविध गावांतील प्रदूषणाचा प्रश्न हायकोर्टात पोहोचला आहे. परिसरातील दगड खाणींमुळे वहाळ, उलवे, पडेघर, बांववी पाडा आणि बांववी कोळीवाडा या गावांतील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले असून नागरिकांची प्रचंड घुसमट होत आहे. त्यामुळे तातडीने प्रदूषण रोखण्यासाठी सरकारला ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल झाली आहे.

वहाळ येथील राजेंद्र पाटील यांनी अॅड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेतली. 1983 च्या महाराष्ट्र वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत तरतुदींची काटेकोर अंमलबजावणीची मागणी याचिकेतून केली आहे. प्रदूषणामुळे नागरिकांची घुसमट होत आहे. धूळ घरात येत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना घराच्या खिडक्या बंद करणे भाग पडत आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;