Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचं करिअर अभिषेक बच्चनमुळे उद्ध्वस्त? गमावले अनेक मोठे चित्रपट, ‘ त्या’ पोस्टमुळे माजली खळबळ

Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचं करिअर अभिषेक बच्चनमुळे उद्ध्वस्त? गमावले अनेक मोठे चित्रपट, ‘ त्या’  पोस्टमुळे माजली खळबळ

बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील नामवंत कुटुंबापैकी एक आहे. अमिताभ, जया, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन तसेच नुकताच बॉलिवूडमध्ये आलेला अगस्त्य नंदा, अशी कलाकांराची फौजच गेल्या अनेक काळापासून बॉलिवूड गाजवतंय. मात्र सध्या बच्चन कुटुंब वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे, ते म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील बेबनाव. गेल्या काही काळापासून त्या दोघांमधील वादाच्या चर्चा फिरत असून ते विभक्त होणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. बराच काळ दोघांसह बच्चन कुटुंबानेदेखील या विषयावर मौन राखले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याने या विषयावरची चुप्पी तोडली असून आपण अद्यापही विवाहीत असल्याचे स्पष्ट केले होते.

एकीकडे अभिषेकने घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला. पण ऐश्वर्याने आत्तापर्यंत यावर मौन का पाळले आहे, असा सवाल काही चाहत्यांच्या मनात आहे. याचदरम्यान, आणखी एक पोस्ट व्हायरल होत असून अभिषेकने त्याची पत्नी ऐश्वर्या रायचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे.

अभिषेकमुळे ऐश्वर्याचे करिअर बरबाद ?

Reddit (रेडीट) वरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामुळे चाहते मात्र हैराण झाले आहेत. या पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की , ‘ शाहरुख खानच्या हॅपी न्यू ईअर या सिनेमात दीपिका पडूकोण झळकली, पण आधी ती भूमिका ऐश्वर्या राय हिला ऑफर करण्यात आला होता. मात्र अभिषेक बच्चन खूप असुरक्षित होता आणि ऐश्वर्याने शाहरूखसोबत काम करू नये अशी त्याची इच्छा होती.’

अनेक मोठ्या ऑफर्स हिसकावून घेतल्या ?

एवढंच नव्हे तर दोस्ताना हा गाजलेला चित्रपट देखील प्रियांका चोप्राच्या आधी ऐश्वर्याला ऑफर झाला होता. मात्र अभिषेकने तिला या चित्रपटातही काम करू दिलं नाही. कारण ती जी भूमिका साकरणार होती, ती (चित्रपटात)दुसऱ्या कलाकारासोबत निघून गेली असती, आणि अभिषेकला ते मान्य नव्हतं. ऐश्वर्याला अनेक मोठ्या चित्रपटाच्या ऑफर्स आल्या, पण तिने काही ना काही कारण देऊन ते चित्रपट करण्यास नकार दिला, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला. दरम्यान, या व्हायरल दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अंबानींच्या लग्नातही बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही ऐश्वर्या

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका यांचा विवाह गेल्या महिन्यात पार पडला. त्यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. बच्चन कुटुंबियांनीही या लग्नाला हजेरी लावली, अभिषेक त्यांच्यासोबत होता पण ऐश्वर्या राय आणि आराध्या यावेळी तिथे नव्हत्या. त्या दोघींनी नंतर वेगळी एंट्री केली. त्यामुळे अभिषेकला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं. दोघांमध्येही सर्व काही आलेबल नसल्याच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;