अदानींना मुंबईतील आणखी दोन मोठे भूखंड देण्याची तयारी; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

अदानींना मुंबईतील आणखी दोन मोठे भूखंड देण्याची तयारी; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत नगरविकास खात्याच्या फाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खटके उडाले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. हे तीन टोळ्यातील गँगवॉर आहे. तीन गँग एकत्र येऊन सत्चा चालवतात. मुंबईत अंडरवर्ल्डच्या माध्यमातून गँग चालवल्या जात होत्या. या गँग लुटपाट करायच्या. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे सरकार तीन गँग चालवत असून त्यामाध्यमातून आपापल्या लोकांशी दिवाशी केली जाते, असा आरोप राऊत यांनी केला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी या गँगने अदानी यांना मुंबईतील 20 भुखंड आधीच दिलेले आहेत. आता आणखी दोन मोठे भुखंड दिले जात आहेत. यातील एक भुखंड कांजूर येथील तर दुसरा मुंबई शहरातील आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली 22 बहुमुल्य भुखंड लुटले जात आहेत. महाराष्ट्रात तीन गँगचे सरकार असल्यानेच आपापल्या लोकांना असे भुखंड वाटले जात आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी मुंबईत अंर्डवर्ल्डचा दबाव असताना लँड माफिया निर्माण झाला होता. आज धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून या गँगचे लाडके उद्योपगती लँडग्रॅबिंग करत आहेत. आणखी दोन भुखंड त्यांच्या नावावर जात असतील तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना या प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. तसेच तीन टोळ्यांमध्ये गँगवॉर पेटलेले आहे. फडणवीस आणि मिध्यांच्या गँगमध्ये जास्त वॉर असून तिसरी गँग आल्याने हे आणखी पेटले आहे, असेही राऊत म्हणाले.

बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला; संजय राऊत यांचा घणाघात

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली. ही अशी हप्तेबाजी कितीही झाली तरी हे सरकारी पैसे असून याचा लाभ महाराष्ट्रातील लाभार्थींनी घ्यायला पाहिजे. हे कोणाच्या खिशातील पैसे नाहीत. पण मतांसाठी निर्माण केलेली योजना दोन महिन्यांनी सरकार जातात बंद होऊल आणि आम्ही नव्या स्वरुपात या योजनेचे पुनर्जीवन करू, असा विश्वास राऊत यांनी दिला.

दरम्यान, पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी ‘ठाकरे-2’ सरकारमधील मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही शिवसेना भवनावर नेहमीच तिरंगा फडकवतो. आमची विचारधारा तिरंगा न फटकवण्याची कधीच नव्हती. ज्यांची होती ते आज महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत आहेत. त्यांच्या बरोबर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतून फुटून गेलेले लोक बसलेले आहेत. आम्ही तिरंग्याचा नेहमीच सन्मान केला आणि बलिदान दिले. पुढच्या वर्षी मंत्रालयाच्या आवारात जो सोहळा होईल त्यात ‘ठाकरे-2’ सरकारचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल, असे राऊत म्हणाले.

काही जण बळजबरीने आपले विचार देशावर लादत आहेत… काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;