आतापासूनच धमक्या सुरू झाल्या, म्हणूनच हे सरकार आपल्याला खाली खेचायचंय; जयंत पाटील यांचा निर्धार

आतापासूनच धमक्या सुरू झाल्या, म्हणूनच हे सरकार आपल्याला खाली खेचायचंय; जयंत पाटील यांचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. ही यात्रेत तुळजापूर, धाराशिव येथील सभेत जयंत पाटील यांनी महायुतीच्या भ्रष्ट आणि दमदाटी, धमक्या देण्याच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच आता हे सरकार आपल्याला खाली खेचायचे आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी राज्यातील जनता आता महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. जनतेत भाजप सराकरविरोधात प्रचंड रोष आहे. 50 रुपयांची वस्तू यांच्या काळात 100 रुपयांची झाली. जीएसटी वाढवल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. या सरकारला शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्याशी काही देणेघेणे नाही. कर गोळा करून स्वतःचे कमीशन घेण्यात सरकार गुंतले आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवले जात आहेत. तरीही सरकार काही बोलत नाही. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. येत्या काळात आपल्याला महाराष्ट्र बेरोजगारी आणि महागाईमुक्त करायचा आहे, त्यासाठी हे भ्रष्ट सरकार आपल्याला खाली खेचावेच लागेल, असेही जयंत पाटील म्हणाले. सरकार योजनांवर जेवढा खर्च करत नाही, त्यापेक्षा जास्त खर्च जाहिरातींवर करण्यात येतो, हे दुर्दैवी आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपबाबत जनतेच्या मनात नाराजी आहे. त्यांनी आमदारांना हातीश धरून पक्ष फोडले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच सत्तेसाठी सोबत घेतले. यामुळे भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची रेटिंग कमी झाली आहे. सरकारमधील लोकं आता दमदाटीही करू लागले. विधानसभा निवडणुका अजून लांब असून आतापासूनच धमक्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार आपल्याला खाली खेचायचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;