मोठी बातमी: गोव्याहून मुंबईला येणाऱ्या विमानाचे उड्डाण अचानक रोखले

मोठी बातमी: गोव्याहून मुंबईला येणाऱ्या विमानाचे उड्डाण अचानक रोखले

गोव्यातील दाबोलीम विमानतळावरून मुंबईसाठी निघालेले एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण बुधवारी सकाळी अचानक रोखण्यात आले. त्याचे कारण आता समोर आले आहे. या विमानाला पक्ष्यानं धडक दिल्यानं विमानाचं टेकऑफ रद्द करावं लागलं, अशी माहिती एका अधिकाऱ्यानी दिली.

सकाळी 6.45 वाजता ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

दाबोलिम विमानतळावरून (दक्षिण गोव्यातील) मुंबईला येणारं हे विमान पक्ष्यानं धडकल्यानं धावपट्टीवर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. टेकऑफ रद्द करावं लागल्याची माहिती विमानतळावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली.

ते म्हणाले, ‘टेक-ऑफ तात्काळ रद्द करण्यात आलं आणि पुढील तपासणीसाठी विमान उभं करण्यात आलं आहे’.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;