सरकारला लाडकी बहिण भाऊ दिसते पण शेतकरी दिसत नाही, रयत शेतकरी संघटनेचा संताप
नापिकी, पिकांना हमीभाव नाही, कर्जाचा डोंगर यांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु, सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. उलट सरकारला लाडकी बहिण, लाडका भाऊ दिसतो पण शेतकरी दिसत नाही, अशा शब्दांत रयत शेतकरी संघटनेने मिंधे सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात संतप्त शेतकऱ्यांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. सरकारने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर 1 सप्टेंबर रोजी जिल्हाभर रास्ता रोकोचा इशारा रयत शेतकरी संघटनेने मिंधे सरकारला दिला आहे.
सरकारला केवळ लाडकी बहिण, लाडका भाऊ दिसतो पण, शेतकरी दिसत नाही. शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळावे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर 1 सप्टेंबर रोजी जिल्हाभर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन रयत शेतकरी संघटनेच्या वतीने नंदूरबारचे निवासी जिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले आहे.
केवळ 3 टक्के शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान
तब्बल 4200 शेतकऱ्यांचे 45 कोटींचे ठिबक सिंचनाचे अनुदान अडीच वर्षांपासून रखडले आहे. केवायसी करूनही जिह्यातील केवळ 3 टक्के शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List