जेवण द्यायला नकार दिल्याने शिवीगाळ, शर्टही फाडलं, ढसाढसा रडू लागले; नाना पाटेकर यांचा हा किस्सा माहीत आहे काय?

जेवण द्यायला नकार दिल्याने शिवीगाळ, शर्टही फाडलं, ढसाढसा रडू लागले; नाना पाटेकर यांचा हा किस्सा माहीत आहे काय?

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याबाबतचे अनेक किस्से नेहमी व्हायरल होत असतात. दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबतची त्यांची केमिस्ट्री आणि वाद हे नेहमीच चर्चेत असतात. प्रसिद्ध दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी नाना पाटेकर यांच्या संबंधितील एक किस्सा सांगितला आहे. परिंदा या सिनेमाच्यावेळचा हा किस्सा आहे. सेटवरच नाना पाटेकर यांच्यासोबत कसं वाजलं होतं आणि नाना कसे रडू लागले होते, याची माहिती विधु विनोद चोप्राने दिली आहे.

काय घडलं होतं?

परिंदाच्या सेटवर नाना पाटेकरने जेवण मागितलं होतं. त्यांना प्रोडक्शनने जेवण देण्यास नकार दिला. कारण परिंदा कमी बजेटचा सिनेमा होता. सर्वांना घरूनच जेवण घेऊन यायला सांगण्यात आलं होतं, असं विधु विनोद चोप्रा म्हणाले. नाना यांनी सेटवर जेवण मागितलं होतं, त्याचं विधु विनोद चोप्रा यांना आश्चर्य वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी तुम्ही घरून जेवण आणलं नाही का? असा नाना यांना सवाल केला. त्यावरून नाना आणि विधु यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. विधु विनोद चोप्रा यांनी तर नाना पाटेकर यांचे शर्ट फाडलं होतं. विशेष म्हणजे पुढच्या सीनमध्ये नाना पाटेकर यांना हे शर्ट घालायचं होतं. यावरून या दोघांमध्ये किती मोठा वाद झाला होता हे दिसून येतं.

रडतच सीन दिला

हा झगडा सुरू असतानाच सिनेमॅटोग्राफर बिनोद प्रधान यांनी शॉट तयार असल्याचं सांगितलं. त्यांनी टेक द्यायलाही सांगितलं. त्यानंतर विधु विनोद चोप्रा सीन शूट करण्यासाठी खुर्चीवर बसले होते. नाना पाटेकर यांचं शर्ट फाटलेलं होतं. त्यामुळे बनियानवरच ते शुटींग करत होते. या सीनमध्ये नाना पाटेकर यांना रडायचं होतं. सीनच्या डिमांडनुसार नाना रडलेही. पण ते अश्रू सिनेमातील सीनचे नव्हते. ते खरे होते. विधु यांच्यासोबत जे भांडण झालं होतं, त्यामुळे नाना पाटेकर ढसाढसा रडले होते. त्यांचं रडणं सुरू असतानाच त्यांनी हा सीन दिला होता, असं विधु यांनी सांगितलं.

नानांची कमाल

1989मध्ये परिंदा हा सिनेमा आला. जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित आदी बडे स्टार या सिनेमात होते. या सिनेमात नाना पाटेकर यांनी व्हिलनची भूमिका केली. ही भूमिका आधी नसिरुद्दीन शाह करणार होते. पण त्यांनी सिनेमा सोडला आणि ही भूमिका नाना पाटेकर यांच्या वाट्याला आली. विशेष म्हणजे जॅकीची भूमिका नाना करणार होते. पण अनिल कपूर यांनी नानांचा पत्ता कट केला. या रोलमुळे नाना सुपरस्टार होतील, अशी भीती वाटल्याने अनिल कपूरने नाना पाटेकर यांचा पत्ता कट केला आणि ही भूमिका जॅकीला मिळाली. पण नसिरुद्दीन शाह यांनी सिनेमा सोडल्यानंतर नाना पाटेकर यांची या सिनेमात एन्ट्री झाली. नानाची या सिनेमातील भूमिका प्रचंड गाजली. नानांना खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. तर सिनेमाने त्यावेळी 9 कोटींची कमाई केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;