नाती बनतायत-बिघडतायत..; अभिषेक-करिश्माच्या मोडलेल्या साखरपुड्यावर काय म्हणाले बिग बी?

नाती बनतायत-बिघडतायत..; अभिषेक-करिश्माच्या मोडलेल्या साखरपुड्यावर काय म्हणाले बिग बी?

गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब सतत सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. एकीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. तर दुसरीकडे जया बच्चन यांनी संसदेतील त्यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. अशातच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते अभिषेक आणि करिश्मा कपूर यांच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत. एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता, असं म्हटलं जातं. मात्र लग्नाआधीच या दोघांचं नातं तुटलं. कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये खास नातेसंबंध सुरू होण्याआधीच सर्वकाही संपुष्टात आलं होतं.

अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमधील आहे. या शोमध्ये करण त्यांना अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याविषयी प्रश्न विचारतो. “कुटुंबासाठी ती वेळ फार कठीण होती का?”, असा सवाल करण बिग बींना करतो. त्यावर ते म्हणतात, “ते अत्यंत नाजूक क्षण होते. नाती बनत होत्या आणि बिघडत होत्या. कोणत्याही व्यक्तीसाठी हे सर्व सहन करणं खूप कठीण असतं. जर परिस्थिती तुमच्यासाठी ठीक नसेल तर मार्ग वेगळे करण्यातच तुमचं भलं असतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बच्चन कुटुंबीयांनी तर एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘होणारी सून’ असा केला होता. जया बच्चन यांनी एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘माझी होणारी सून’ असा केला होता. माध्यमांसमोर त्यांनी करिश्मा आणि अभिषेकचं लग्न जाहीर केलं होतं. यावेळी मंचावर संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;