किरकोळ वादातून युवकाची हत्या
किरकोळ वादातून युवकाची हत्या झाल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. अहमद मोहंमद सईद पठाण असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्याची रवानगी बालगृहात केली आहे. एक जण पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अहमद पठाण हा गोवंडी परिसरात राहत होता. तर अल्पवयीन मुले देखील त्याच परिसरात राहत होती.
काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग एकाच्या डोक्यात होता. त्याने अल्पवयीन मुलांना अहमदवर हल्ला करण्यास सांगितले. शनिवारी अहमद हा प्लॉट नंबर 25 येथील पाण्याची टाकी येथे आला. तेथे आल्यावर त्याने अहमद सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्या तिघांनी अहमदवर हल्ला करून पळ काढला. जखमी असलेल्या अहमदला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. याची माहिती समजताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी आले.
अहमदच्या भावाने दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत एकाचे नाव समोर आले. ताब्यात घेतलेल्या त्या तिघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List