पंतप्रधान वायनाडला गेले चांगलचं आहे, त्यांनी मणिपूरलाही जावं; काँग्रेसचा जोरदार टोला

पंतप्रधान वायनाडला गेले चांगलचं आहे, त्यांनी मणिपूरलाही जावं; काँग्रेसचा जोरदार टोला

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसाने झालेल्या भूस्खलनात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात 30 जुलैला ही घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वायनाड दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भूस्खलन झालेल्या परिसराची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनही होते. यानंतर घटनास्थळी जाऊन पंतप्रधान मोदी यांनी माहिती घेतली. घटनेच्या 11 दिवसांनी पंतप्रधान मोदी हे वायनाड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसने पंतप्रधानांच्या वायनाड दौऱ्याचं स्वागत केलं आहे. पण मणिपूरमधील हिंसाचारावरून टोलाही लगावला आहे.

वायनाडमध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. यात 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. वायनाडमधील भूस्खलनाची दुर्घटना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसने केली होती. आणि आज पंतप्रधान वायनाडला गेलेत, हे चांगलं आहे. त्यांनी मणिपूरला भेट दिली तर बरं होईल. दीड वर्षापासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे त्यांनी मणिपूरलाही जावं, असा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लगावला.

पंतप्रधानांनी सर्वच ठिकाणी दौरा करावा. त्यांनी युक्रेनला जावं, रशियाला जावं. वायनाडचा दौरा गरजेचाच आहे. त्यासोबत मणिपूरलाही भेट देणं गरजेचं असल्याचं जयराम रमेश म्हणाले. आज दार्जिलिंगचे एक शिष्टमंडळ मला भेटण्यासाठी आलं होतं. 10 वर्षांत पंतप्रधानांनी एकदाही दौरा केला नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. पंतप्रधानांनी दौरा करावा, असं सगळ्यांनाच वाटतं. नॉन बायलॉजिकल असलेल्या पंतप्रधानांना सर्वांना बघायचंय, ऐकायचं, असा चिमटाही जयराम रमेश यांनी काढला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;