‘लाडकी बहीण’ योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई; मिंधेंचा दावा खोडून काढत अजित पवारांनी दिलं उत्तर
महायुतीमध्ये सध्या प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेपेक्षा त्या योजनेचं क्रेडिट घेण्यावरून युद्ध पेटलं आहे. ज्यामुळे महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. या ‘क्रेडिट वॉर’वर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ यांनी आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी गुरुवारी आपल्या पक्षाची ‘जन सन्मान यात्रा’ नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू केली आहे.
इंडिया टुडेने या संदर्भात अजित पवार यांच्याशी संवाद साधल्यानंतर एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यावरून सध्या मिंधे गट श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावरून या योजनेचे श्रेय कोणाला जाते, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘महायुती सरकारने ही योजना आणली आहे. मी अर्थसंकल्प सादर केला. आम्ही मिळून ही योजना तयार केली.’
ते पुढे म्हणाले की, ‘आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही वेगवेगळ्या योजनांबद्दल चर्चा करतो ज्या आम्हाला राज्यात लागू कराव्यात असे वाटते. आर्थिक स्थिती जाणून घेतल्यानंतर, आम्ही कोणती योजना पुढे द्यायची याचा निर्णय घेतो’.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List