कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे! ‘इंडिया’ आघाडीचे खासदार आक्रमक
On
कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजी करीत खासदार नीलेश लंके यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोर कांदा तसेच शेतमालाच्या हमीभावासाठी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधले.
शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय , खाली डोकं वर पाय, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, किसान विरोधी मोदी सरकार शरम करो, शरम करो, किसान विरोधी मोदी सरकार हाय हाय, कीसान की फसल को एमएसपी दो, किसानपर अन्याय बंद करो अशी आक्रमक घोषणाबाजी करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसर दणाणून सोडला होता.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. नीलेश लंके यांनी केले. आंदोलनात माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे गुरूजी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी हे सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेल्या टी डी पी, समाजवादी पार्टीच्या खासदारांनीही या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी केली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List