#Bangladesh: अरुणाचलला अवैध स्थलांतरितांचा धोका? अनेकजण सीमाभागातून शिरण्याच्या तयारीत, विद्यार्थी संघटनेने केली सीमेवर कडक नजर ठेवण्याची मागणी

#Bangladesh: अरुणाचलला अवैध स्थलांतरितांचा धोका? अनेकजण सीमाभागातून शिरण्याच्या तयारीत, विद्यार्थी संघटनेने केली सीमेवर कडक नजर ठेवण्याची मागणी

 

अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या संघटनेने हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित करत भिती व्यक्त केली आहे. बांगलादेशातील अवैध स्थलांतरित अरुणाचलच्या सीमाभागातून प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते रोखण्यासाठी सीमेवर कडक पाहारा ठेवत दक्षता वाढवण्याची सरकारला विनंती केली आहे.

राज्याचे गृहमंत्री मामा नाटुंग यांना दिलेल्या निवेदनात, ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंट्स युनियन (AAPSU) ने म्हटलं आहे की अनेक रिपोर्टमध्ये अशी शक्यता वर्तवली आहे की शेजारील देशातील बरेच लोक विस्थापित झाले आहेत आणि त्यांनी बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, आम्हाला मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाल्याच्या आणि अवैधरित्या हिंदुस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्नात असल्याच्या बातम्या मिळाल्या आहेत’, असं त्यात म्हटलं आहे.

राज्याच्या विद्यार्थी संघटनेनं सांगितलं की ते ‘अरुणाचल प्रदेशात अवैध स्थलांतरितांच्या संभाव्य प्रवेशाबद्दल खूप चिंतीत आहेत, ज्यामुळे मूळच्या आदिवासींना धोका निर्माण होऊन राज्याचा लोकसंख्याशास्त्रीय समतोल बिघडू शकतो’, असे AAPSU ने मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

‘कोणतेही बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही सरकारला गंभीर्यानं आणि तत्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन करतो’, असंही त्यात म्हटलं आहे.

आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि राज्याची सामाजिक-सांस्कृतिक अखंडता राखण्यासाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण आहेत, असा विद्यार्थ्यांच्या संघटनेचा ठाम विश्वास आहे.

बांगलादेशात मंगळवारी झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये मृतांची संख्या 440 वर पोहोचली आहे, स्थानिक मीडियानुसार, हिंसाचारग्रस्त देशात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहे.

नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नियुक्ती केली होती, ज्याच्या एका दिवसानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि नोकऱ्यांमधील विवादास्पद कोटा प्रणालीवर त्यांच्या सरकारच्या विरोधात निषेधानंतर देश सोडून पळ काढला.

नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार गुरूवारी शपथ घेणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;