इंडिया आघाडीची विजयी घोडदौड कायम राखणार! उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट

इंडिया आघाडीची विजयी घोडदौड कायम राखणार! उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात इंडिया आघाडीला दणदणीत यश मिळवून दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीतही ‘इंडिया’ आघाडीची विजयी घोडदौड कायम राखण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात आज झालेल्या बैठकीत करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी आज राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर हे तीन नेते आज पहिल्यांदाच एकत्र आले होते. यावेळी त्यांच्यात देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. विशेषकरून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल विस्तृत चर्चा झाली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम करून दणदणीत विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांची वेळोवेळी बैठक व्हावी आणि विचारविनिमय करून रणनीती आखण्यात यावी, अशी सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी मांडली. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरेही याप्रसंगी उपस्थित होते.

आज सकाळपासूनच उद्धव ठाकरे व कुटुंबीयांना भेटण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रीघ लागली होती. समाजवादी पक्षाचे खासदार आदित्य यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, अपक्ष खासदार विशाल पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सर्वसंमतीने ठरवणार

महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार का, या मुद्दय़ाबाबतही उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आघाडीतील सर्व पक्ष मिळवून सर्वसंमतीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवतील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचे गठन एका व्यक्तीसाठी नाही, तर देशाला आणि महाराष्ट्राला लुटणारी युती आहे तिला सत्तेतून खाली खेचण्यासाठी झाले आहे. मुख्यमंत्री कधीही आम्ही बसून ठरवू शकतो. महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरे आहेत, पण महायुतीकडे जे चेहरे आहेत त्यातील एकही मुख्यमंत्रीपदासाठी लायक नाही. त्यांच्या कार्यकाळात जो कारभार सुरू आहे तशी स्थिती पुढे महाराष्ट्रात पुन्हा यावी असे जनतेच्या मनात नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडी एकसंध होऊन आगामी निवडणुकीला सामोरी जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;