जनतेच्या सहनशीलतेचा अंत राज्यकर्त्यांनी पाहू नये, नाही तर…; उद्धव ठाकरे यांनी दिला सूचक इशारा

जनतेच्या सहनशीलतेचा अंत राज्यकर्त्यांनी पाहू नये, नाही तर…; उद्धव ठाकरे यांनी दिला सूचक इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारी दिल्लीत दाखल होताच दिल्ली ते देशाच्या गल्ली गल्लीपर्यंत चर्चा सुरू झाली. देशभरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी रांग लावली. उद्धव ठाकरे आपल्या दिल्ली दौऱ्यात माध्यमांशी काय संवाद साधणार याकडे साऱ्यांचं लक्षं होतं. सारी माध्यमं तर्कवितर्क लढवत होती तसतशी देशभरात उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसत होतं. अखेर बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आणि अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

पहिल्या प्रथम त्यांनी आपल्या दिल्ली भेटीचं कारण स्पष्ट केलं. ‘लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही. अधिवेशन सुरू असल्याने INDIA आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. जसजसं जमेल तसतसं INDIA आघाडीतील लोकांना नेत्यांना भेटावं. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आपण कसं पुढे जाऊ शकतो त्यावर साधक बाधक चर्चा करावी. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि अन्य दोन तीन राज्यांच्या निवडणुकाही होणार आहेत त्याही बाबतीत INDIA आघाडी म्हणून एकसंध पणाने आपण लढायला पाहिजे आणि एकमेकांचं सहकार्य आपण कसं घेऊ शकतो याचीही चर्चा होणे आवश्यक आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बांगलादेशातील परिस्थिती संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ‘जगभर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चालला आहे. इस्रायलच्या जनतेच्या उठावामुळे तिथल्या पंतप्रधानांना बाहेर पडता येत नव्हतं. पाठोपाठ श्रीलंका, बांगलादेशातही हे दिसलं. एकूणच काय तर सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये. तो जर पाहिला तर जनतेचं न्यायालय काय असतं हे बांगलादेशच्या घटनेतून जनतेनं दाखवून दिलं’, अशा सूचक शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;