बांगलादेशात विदेशातून कट कारस्थान झालं का? सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सवाल; तो पाकिस्तानी अधिकारी चर्चेत

बांगलादेशात विदेशातून कट कारस्थान झालं का? सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सवाल; तो पाकिस्तानी अधिकारी चर्चेत

बांगलादेशमधील अराजक स्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठकीत केंद्र सरकारने बांगलादेश आणि शेख हसीना यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या भूमिकेवर विरोधी पक्षांनीही सहमती दर्शवली आहे. बैठकीत उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न केले.

तत्काळ आणि दीर्घकालीन रणनीतीबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न केला. बांगलादेशात जे काही घडलं, त्यामागे विदेशी शक्तींचा हात आहे का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला. यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट केली.

बैठकीत बांगलादेशातील बदलत्या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने सोशल मीडियावर आंदोलनाचा फोटो डीपीवर लावला होता. आता त्याची माहिती मिळवण्यात येत आहे, असेही बैठकीत सरकारकडून सांगण्यात आले.

सरकारने बैठकीत काय सांगितले?

बांगलादेशात आरक्षणावरून हिंसाचार उफाळला आहे. यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्या हिंदुस्थानच्या आश्रयाला आल्या आहेत. मात्र, त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. ब्रिटनकडून आश्रय दिला जात नाही तोपर्यंत शेख हसीना या हिंदुस्थानात राहतील. पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या शेख हसीना यांना सोमवारी हिंदुस्थानात प्रवासाची परवानगी दिली होती, अशी माहिती सरकारने दिली.

बांगलादेशातील स्थितीवर सरकार सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या बांगलादेशात 12000 ते 13000 भारतीय नागरीक आहेत. पण बांगलादेशातील स्थिती इतकीही भीषण नाही की तिथून नागरिकांना बाहेर काढवं लागेल. तिथे एकूण 20000 नागरीक अडकले होते. त्यापैकी 8000 विद्यार्थी मायदेशात परतले आहेत, अशी माहिती सरकारने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;