आता ब्रेकअप करायला हवं..; रितेशने जिनिलिया पाठवला मेसेज अन् पुढे जे घडलं..

आता ब्रेकअप करायला हवं..; रितेशने जिनिलिया पाठवला मेसेज अन् पुढे जे घडलं..

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा हे बॉलिवूडमधील सर्वांच लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. प्रेम असावं तर असं.. हे दोघांकडे पाहून अनेकांना वाटतं. आधी मैत्री, मग प्रेम आणि लग्न.. अशी रितेश-जिनिलियाची परिपूर्ण प्रेमकहाणी अनेकांनाच माहीत आहे. पण या दोघांच्याही नात्यात अनेक चढउतार आले आहेत. रितेश आणि जिनिलियाने या चढउतारांचा सामना एकत्र करत नात्यातील प्रेम आणि आदर आणखी दृढ केला. हे दोघं जेव्हा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहुणे म्हणून पोहोचले, तेव्हा त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला होता. जिनिलियाला डेट करत असताना रितेशने एकेदिवशी तिला ब्रेकअपचा मेसेज केला होता. हा मेसेज पाहून जिनिलियाला आश्चर्याचा धक्काच बसला होता.

रितेशने अचानक एकेदिवशी जिनिलियाला ब्रेकअपबद्दलचा मेसेज पाठवला होता. खरंतर रितेश तिच्यासोबत प्रँक करत होता. त्याच उद्देशाने त्याने तो मेसेज केला होता. जिनिलिया त्यावर कशी प्रतिक्रिया देईल, हे त्याला पहायचं होतं. पण झालं उलटंच. जिनिलियाला रितेशची मस्करी समजली नाही आणि तिने तो मेसेज गांभीर्याने घेतला. ती खूप नाराज झाली होती. त्यावेळी दोघांचं नातं खरंच ब्रेकअपवर आलं होतं. शेवटी कसंबसं रितेशने हा आपला प्रँक असल्याचं जिनिलियाला समजावलं. त्यानंतर दोघांमध्ये कधीही वेगळं होण्याचा विषय निघाला नाही. त्या घटनेनंतर रितेशने पुन्हा कधीच तिच्यासोबत प्रँक करण्याचा प्रयत्न केला नाही. रितेश आणि जिनिलिया एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात, याचाही खुलासा दोघांनी कपिल शर्माच्या शोमध्ये केला होता. रितेश जिनिलियाला ‘जिनी’ म्हणून हाक मारतो. तर ती त्याला ‘ढोलू’ म्हणते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जिनिलियाची पहिल्यांदा भेट झाली होती. तेव्हा रितेश हा अत्यंत बिघडलेला मुलगा आहे, असं जिनिलियाला वाटलं होतं. मात्र शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. रितेश आणि जिनिलियाने लग्नापूर्वी जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

रितेश आणि जिनिलियाने 2002 मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती आणि 2003 मध्ये एका चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांना लग्नाचा सीन करावा लागला होता. “भविष्यात काय होईल, माहीत नाही. पण या क्षणाचा आनंद आपण घ्यायला हवा, असा विचार करत आम्ही तो सीन हसण्यावारी नेला आणि पुढे गेलो,” अशी आठवण रितेशने या शोमध्ये सांगितली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;