आश्रम शाळेतल्या 27 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, डहाणूतला धक्कादायक प्रकार
आश्रम शाळेतल्या 27 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. डहाणूत हा धक्कादायक प्रकार घडला असून सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी जेवणातून दुधीची भाजी खाल्ली होती. रात्री उशिरा त्यांना त्रास झाला त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List