मुंबई-नाशिक महामार्गावर मृत्यूचा दबा कसारा घाट खचला; संरक्षक जाळ्या तुटल्या रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधींचा निधी ठेकेदाराच्या घशात

मुंबई-नाशिक महामार्गावर मृत्यूचा दबा कसारा घाट खचला; संरक्षक जाळ्या तुटल्या रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधींचा निधी ठेकेदाराच्या घशात

नाशिक महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर अर्धा एक फूट खोल खड्डे पडले आहेत. हे कमी म्हणून की काय आता कसारा घाट खचू लागला आहे. ठिकठिकाणी दरडी आणि माती ढासळून रस्त्यावर येत आहे. यामुळे संरक्षक जाळ्याही तुटल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. वर्षभरात घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला. मात्र हा सर्व निधी अधिकारी आणि ठेकेदाराच्या घशात गेल्याने मुंबई- नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांवर मृत्यू दबा धरून असल्याचे भीषण वास्तव आहे.


जूनला पाऊस सुरू होताच मुंबई-नाशिक एक्स्प्रेस वेवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी महामार्ग दोन ठिकाणी खचला होता. रस्त्याला महाकाय तडे गेले होते. त्यामुळे महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधींचा ठेका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदाराला दिला. रस्त्याची दुरुस्ती आणि संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या.

दर्जेदार कामे केल्याचा दावा ठेकेदारकंपनीने केला होता. मात्र हा दावा किती पोकळ होता हे आता पाहायला
मिळत आहे. निकृष्ट कामामुळे नवीन रस्ता उखडला आहे. संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. कसारा घाट खचत असून दरडी, माती रस्त्यावर येत आहे. रस्त्यावर पाणी तुंबून राहात असल्याने खड्ड्यातून वाहने चलवावी लागत आहेत. कसारा घाटात आठ नागमोडी वळणे आहेत. प्रत्येक वळणावरील संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत, वाहने दरीत कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.

मंत्र्यांना किंमत नाही
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवासकरण्यास मंत्रीसुद्धा तयार नाहीत. वारंवार सांगूनही अधिकारी, ठेकेदार महामार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने दादा भुसे, छगन भुजबळ, अदिती तटकरे आदी मंत्री रस्ते प्रवास टाळून रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत आहेत. दौऱ्यावर येता जाता मंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिव, आमदार, खासदार नाशिकमधून मेल एक्स्प्रेस किंवा कसारा रेल्वे स्थानकावरून सीएसएमटी लोकल पकडून मुंबई गाठतात.

जीवघेणी ठिकाणे
जुन्या कसारा घाटातील साईबाबा खिंड, आंबा पॉईंट, हिवाळा ब्रिज वळण, त्यापुढील २ किलोमीटरचा रस्ता तसेच नवीन घाटातील बिबलवाडी वळण, ब्रेक फेल पॉईंट, धबधबा पॉईंट, लतीफवाडी उतार, ओहळाची वाडी ही ठिकाणे
धोकादायक आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;