अकोल्यातल्या तरुणीची दिल्लीत आत्महत्या, चिठ्ठी लिहून सांगितले कारण

अकोल्यातल्या तरुणीची दिल्लीत आत्महत्या, चिठ्ठी लिहून सांगितले कारण

दिल्लीत एका 26 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. नैराश्यातून या तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ही तरुणी मुळची अकोला जिल्ह्याची रहिवासी असून दिल्लीत ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने चिठ्ठी लिहिली आहे.

अंजली असे या तरुणीचे नाव होते. अंजली मुळची अकोला जिल्ह्याची रहिवासी होती. कलेक्टर बनण्याचं स्वप्न पाहून अंजली दिल्लीत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसीठी आली होती. दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये भाड्याच्या खोलीत अंजली रहायची आणि अभ्यास करायची. मृत्यूपूर्वी अंजलीने चिठ्ठी लिहिली आहे. यात तिने आई वडिलांची माफी मागितली आहे. अंजलीने म्हटले आहे की आई बाबा मला माफ करा, मी आयुष्याला खुप कंटाळली आहे, माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त अडचणीच आहेत. कुठेही शांतता नाही, या सर्वांमधून मी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण मला यश मिळाले नाही. ”

अंजलीची मैत्रीण श्वेताने दिलेल्या माहितीनुसार तिने तीन वेळा UPSC ची परीक्षा दिली होती. पण तीनहीवेळा तिला अपयश आले. गेल्या काही महिन्यात इथल्या घरांचे भाडे वाढले होते त्यामुळेही त्रस्त होती असेही श्वेताने म्हटले आहे.

अंजलीने आपल्या चिठ्ठीत यावरही भाष्य केले आहे. भाड्याची घरं आणि हॉस्टेलची भाडं कमी झाले पाहिजे, इथले लोक फक्त लुटायला बसले आहेत, विद्यार्थ्यांना हे परवडत नाही असे अंजलीने म्हटले आहे.

अंजलीने आपल्या चिठ्ठीत सरकारलाही विनंती केली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक ठिकाणी घोटाळा होत आहे. तो सरकारने कमी करावा आणि सरकारी नोकऱ्यांची संख्या वाढवावी, अनेक तरुण तरुणी नोकऱ्यांसाठी संघर्ष करत आहेत असेही अंजलीने म्हटले आहे.

अंजली ज्या घरात भाड्याने रहायची त्याचे महिन्याचे भाडे 15 हजार रुपये होते. पण घरमालकाने ते वाढवून 18 हजार रुपये केल्याचे तिची मैत्रीण श्वेताने सांगितले. दुसरीकडे तिच्या पालकांनी अंजलीला एका व्यक्तीकडून त्रास होत होता अशी तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी स्पर्धा परिक्षेच्या क्लासमध्ये पाणी भरून तिघांचा मृत्यू झाला होता. तेव्हाच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;