लोकांना न्यायालयीन प्रक्रिया शिक्षा वाटते; सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत

लोकांना न्यायालयीन प्रक्रिया शिक्षा वाटते; सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत

लोकांना न्यायालयीन प्रक्रिया शिक्षेसारखी वाटते. त्यांना फक्त निकाल हवा असतो. खटल्यांना लोकं कंटाळली आहेत. ही बाब आपल्या सर्वांसाठी चिंताजनक आहे, असे परखड मत सरन्यायाधीश डॉ. धनजंय चंद्रचूड यांनी शनिवारी व्यक्त केले.
तोडगा देणार नाही. चांगला निकाल देऊ, असे आम्ही सांगत असतो. पण लोकांना ते मान्य होत नाही असे सांगत सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड म्हणाले, एका विशिष्ट ध्येयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. सर्वोच्च न्यायालय हे संपूर्ण भारताचे आहे. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाची वास्तू असली तरी येथील रजिस्ट्रीमध्ये देशभरातील अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संपूर्ण भारतातील वैविधतेचे प्रतिनिधित्व करतात.

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त 29 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत विशेष लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एका उंच व्यासपीठावर बसतात. हायकोर्ट किंवा जिल्हा न्यायालयात पक्षकार कोण आहे हे कळते. सर्वोच्च न्यायालयात तसे होत नाही. आमच्यासमोर वकील असतात. आम्ही ज्यांना न्याय देतो ते आमच्यासाठी अदृश्य असतात ही आमची मोठी कमतरता आहे, असे सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी सांगितले.

भगवान श्रीकृष्ण लोकअदालतचे जनक

भगवान श्रीकृष्णांनी आपल्या देशात पहिली लोकअदालत आयोजित केली होती. त्यानंतर कौरव आणि पांडवांमध्ये वाद झाला. वाद सोडवण्यासाठी लवादाचा वापर करणे ही आपली संस्कृती आहे, असे कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात आयोजित केलेल्या लोकअदालतमध्ये तब्बल एक हजार प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये दिवाणी खटल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती मंत्री मेघवाल यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;