Bigg Boss 3 OTT : ‘हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’, यानेच पराभूत होऊनही सीजन केले आपल्या नावावर

Bigg Boss 3 OTT : ‘हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’, यानेच पराभूत होऊनही सीजन केले आपल्या नावावर

Bigg Boss 3 OTT winner : अभिनेता शाहरुख खानचा बाजीगर चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग आहे. ‘हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’. ‘बिग बॉस ओटीटी 3’ चे फिनाले नुकताच पार पडले. त्यातील ग्रँड फिनाले एपिसोडमधील स्पर्धकांनी हा संवाद बरोबर सिद्ध केला आहे. या शोमध्ये टॉप पाचमध्ये कृतिका मलिक, रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल आणि नेजी पोहोचले होते. त्यात सना मकबूल विजेती ठरली. परंतु इतर स्पर्धकांची कामगिरी लक्षणीय राहिली. एक स्पर्धकाच्या कामगिरीवर शो चे होस्ट अनिल कपूर चांगलाच प्रभावित झाले. तो या सीझनचा सर्वात मजबूत स्पर्धक होता. अनिल कपूरने त्याचे कौतूक केले. त्याने म्हटले, ‘हा सीझन रणवीर शौरी म्हणून ओळखला जाईल.’ रणवीर ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला, पण लोकांची मने त्याने जिंकली. त्यामुळेच शोचा होस्ट अनिल कपूर याने त्याचे भरभरुन कौतूक केले. त्याची कामगिरी एखाद्या विजयापेक्षा कमी नाही, असे अनिल कपूर याने म्हटले.

अनिल कपूरकडून रणवीरवर कौतुकाचा वर्षाव

‘बिग बॉस ओटीटी 3 ’ चा ग्रँड फिनाले 2 ऑगस्टला झाला. यामध्ये सना मकबूल विजेती ठरली. टॉप 3 मध्ये पोहोचल्यानंतर रणवीर शौरी याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तो जेव्हा स्टेजवर आला तेव्हा अनिल कपूर याने त्याचे कौतुक केले. अनिक कपूरने म्हटले की, हा सीझन रणवीर शौरी म्हणून ओळखला जाईल. मागील सीझनमध्ये सलमान खान याने असे पूजा भट्टसाठी म्हटले होते. पूजा देखील शो जिंकू शकली नाही, परंतु ती एक मजबूत स्पर्धक राहिली होती.

त्याला फक्त 25 लाख रुपये हवे होते

शोच्या एका एपिसोडमध्ये रणवीर म्हणाला होता की, त्याला ट्रॉफी नको आहे, त्याला फक्त 25 लाख रुपये हवे आहेत. बिग बॉसच्या घरात रणवीर याचा हेतू सुरुवातीपासूनच स्पष्ट होता. त्याला 25 लाख रुपये जिंकून त्याच्या मुलाचे भविष्य सुधारायचे आहे. विजेतेपदामुळे मिळणाऱ्या पैशातून तो त्याच्या मुलाला कॉलेजमध्ये पाठवणार होता. त्याच्या मुलगा हारून 13 वर्षांचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

रणवीर स्पष्टच बोलत होतो

‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये रणवीर याची प्रबळ दावेदारी होती. कारण तो जे ही काही बोलत होता, करत होतो ते सर्व काही उघडपणे केले होते. त्याला काही चुकीचे वाटले तर त्याने ते चुकीचे असल्याचे स्पष्ट म्हटले. ते बरोबर असेल तर बरोबर सांगत होता. शोच्या विजेत्या सना मकबूलचे नाव शोच्या आधी ट्रेंड करत होते, पण रणवीरही चर्चेत होता. 25 लाख रुपये जिंकण्यासाठी तो ज्या उद्देशाने शोमध्ये आला होता, तो पूर्ण होईल, अशी आशा लोकांना होती. परंतु त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली. बिग बॉसमध्ये प्रथम कृतिकाला बाहेर काढण्यात आले, त्यानंतर सई आणि रणवीरला बाहेर काढण्यात आले. शेवटी नेजी आणि सना यांच्यात स्पर्धा झाली. प्रेक्षकांकडून अधिक मते मिळाल्यामुळे सना या हंगामाची विजेती ठरली. नेजी उपविजेती राहिली.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;