शिरोळ – पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातला, पुढे अनर्थ घडला; 6 जणांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून शिरोळ तालुक्यातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावांना जोडणारे रस्तेही जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर-ट्रॉली नेण्याचा प्रयत्न अंगाशी आला आहे. जोरदार प्रवाहात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह आठ जण वाहून गेले आहेत. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास अकिवाट- बस्तवाड मार्गावर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अकिवाटमधील पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी काहीजण जात होते. तर काहीजण केळीच्या शेतात कामासाठी जात होते. परंतु ट्रॅक्टर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने ट्रॉली घसरून पलटी झाली आणि आठजण वाहून गेले.
दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांपैकी 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यापैकी एकाची प्रकृती गंभीर दोन जण अद्यापही बेपत्ता आहे. एनडीआरएफचे पथक आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जवान त्यांचा शोध घेत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List