दोन मुलं असूनही 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न का करत नाहीये? अर्जुन रामपालने दिलं उत्तर

दोन मुलं असूनही 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न का करत नाहीये? अर्जुन रामपालने दिलं उत्तर

अभिनेता अर्जुन रामपालने लग्नाच्या 21 वर्षांनंतर पत्नी मेहर जेसियाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर 2019 पासून तो मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या दोघांना आरिक आणि आरव ही दोन मुलंसुद्धा आहेत. मात्र अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी अद्याप लग्न केलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. “एकत्र मुलंबाळं असताना, एक कुटुंब म्हणून एकत्र राहत असतानाही लग्न का नाही केलं”, असं त्याला विचारण्यात आलं होतं. त्यावर अर्जुन रामपालने मुलाखतकर्त्याला प्रतिप्रश्न केला, “लग्न म्हणजे काय?”

‘द रणवीर शो’ या पॉडकास्ट मुलाखतीत अर्जुनने पुढे समजावून सांगितलं की लग्न हे लोकांना बदलू शकतं. “हे मी नाही किंवा ती नाही. पण लग्न म्हणजे काय? शेवटी तो कागदाचा एक तुकडाच. माझ्या मते आम्ही आधीच विवाहित आहोत आणि माझ्या मनात त्याविषयी कोणताच संभ्रम नाही. पण कधीकधी तो कागदाचा एक तुकडासुद्धा तुम्हाला बदलू शकतो. कारण त्यामुळे तुम्हाला ते पर्मनंट वाटू लागतं. पण ही कल्पनाच खोटी आहे. तुम्ही फक्त कायद्याने बांधिल असता”, असं तो म्हणाला.

लग्न हे लोकांची एकमेकांबद्दलची वृत्ती बदलवू शकते, असं मत अर्जुनने मांडलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “तुमची एकमेकांबद्दलची वृत्ती ही लग्न बदलवू शकते. आम्हाला दोघांना तरी हेच वाटतं. आम्हा दोघांमध्ये जे काही घडलं, ते नैसर्गिकरित्या घडलं. मला त्याविषयी अधिक बोलायचं नाही, कारण उगाच त्याला नजर लागेल. मला असं वाटत नाही की मी कोणाला स्पष्टीकरण द्यायला बांधिल आहे. आमच्यासाठी हे नातं सुंदर आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता, तोपर्यंत घेत राहा. आम्ही दोघांनी मनाने एकमेकांशी लग्न केलंय. आम्ही दोघं एकमेकांना योग्य दिशेने पुढे नेतोय आणि त्याचवेळी आम्ही एकमेकांचे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहोत.”

लग्नाच्या बाबतीत विचार वेगळे असले तरी लग्नसंस्थेच्या विरोधात नसल्याचं अर्जुन रामपालने या मुलाखतीत स्पष्ट केलं. “मी कोणालाही लग्न न करण्याचा सल्ला देत नाहीये किंवा मी कोणाला लग्नसंस्थेविरोधात जाण्याचा सल्ला देत नाहीये. कदाचित भविष्यात आम्ही लग्नसुद्धा करू. पण सध्या त्याविषयी काहीच सांगू शकत नाही. भविष्यात काय होईल, हे कोणालाच माहीत नाही”, असं तो म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;