अर्जुन बिजलानीचा गोव्यात अपघात, जखमी अवस्थेतील फोटो समोर

अर्जुन बिजलानीचा गोव्यात अपघात, जखमी अवस्थेतील फोटो समोर

‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन बिजलानी याचा अपघात झाला आहे. खुद्द अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघात झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्यानेत्याने जखमी अवस्थेत फोटो देखील पोस्ट केली आहे. अभिनेत्याचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. शिवाय अनेकांनी अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारणा देखील केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन कुटुंबासोबत गोव्यात सुट्ट्यांसाठी गेला होता. सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना अभिनेत्याचा गोव्यात अपघता झाला. अपघातानंतर अभिनेत्याने फोटो पोस्ट केले आहे. पण आता अर्जुन याची प्रकृती स्थिर असून मुंबईत परतल्यानंतर अभिनेता कामावर देखील हजर झाला आहे.

अर्जुन बिजलानी याने इन्स्टाग्रामवर फोटोंचा कोलाज करत स्टोरीमध्ये पोस्ट केला. फोटोंमध्ये अभिनेत्याच्या पायांना दुखापत झाल्याचं चित्र दिसत आहे. अभिनेत्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अपघात नक्की कसा झाला? याबद्दल अभिनेत्याने काहीही सांगितलं नाही. सध्या सर्वत्र अर्जुन बिजलानी याची चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Bijlani ⚫ (@arjunbijlani)

 

अर्जुन याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने ‘मिले जब हम तुम’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘नागिन’, ‘इश्क में मरजावां’, ‘रुहानियत’, ‘शिव-शक्ति’, Splitsvilla, ‘इंडियाज गॉट टैलेंट’ आणि ‘डांस दीवाने’ यांसारख्या अनेक मालिका आणि शोमध्ये काम केलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Bijlani ⚫ (@arjunbijlani)

 

अर्जुन बिजलानी याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;