रेल्वे अपघात लाजिरवाणे, रेल्वेमंत्री फक्त प्रचारात गुंतलेत; इंडिया आघाडीचा सत्ताधारी NDA वर हल्लाबोल

रेल्वे अपघात लाजिरवाणे, रेल्वेमंत्री फक्त प्रचारात गुंतलेत; इंडिया आघाडीचा सत्ताधारी NDA वर हल्लाबोल

झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुंबई-हावडा मेलचा अपघात झाला. या अपघातात 18 डबे रुळावरून घसरले, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून इंडिया आघाडीने एनडीए सरकारला धारेवर धरले. 2014 पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करत काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला. प्रत्येत आठवड्यात रेल्वे अपघात होत आहेत, हेच सरकारचे व्यवस्थापन आहे काय, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनडीए सरकारवर हल्लाबोल केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनाही सरकारवर तोफ डागली. रेल्वे अपघात सातत्याने होत आहेत. हे लाजिरवाणे आहे. रेल्वे अपघातांवर कारवाई होत नाही. त्याची जबाबदारी कोणाही घेत नाही. रेल्वेमंत्री फक्त प्रचारात गुंतले आहेत, अशी टीका चतुर्वेदी यांनी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, रेल्वे अपघात आता दर आठवड्यात होत आहेत. मंगळवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली. यात दोन जणाचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. हे खूप दुःखद आहे. असे अपघात हेच सरकारचे व्यवस्थापन आहे काय, असा संतप्त सवालही बॅनर्जी यांनी केला.

रेल्वे अपघात आणि प्रवाशांच्या मृत्यूची मालिका किती दिवस सुरू राहणार? हे आम्ही किती दिवस सहन करणार? केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेला अंत होणार का? समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव य़ांनीही एनडीएवर हल्लाबोल केला. सरकारला प्रत्येक क्षेत्रात रेकॉर्ड बनवायचे आहे. सध्या पेपरफुटीचे रेकॉर्ड सुरू होते. आता रेल्वे अपघातांचे रेकॉर्ड तयार केले जात आहे. एवढे मोठे सुरक्षा बजेट असतानाही इतके रेल्वे अपघात का होत आहेत? असा सवालही यादव यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;