मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले, काँग्रेसचा गंभीर आरोप

मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले, काँग्रेसचा गंभीर आरोप

मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी आपल्या उद्योजक मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज सहज माफ करतात असेही काँग्रेसने म्हटले आहे.


काँग्रेसने एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट लिहून म्हटले आहे की मोदी सरकारने गरीब जनतेकडून 5 वर्षात 8 हजार 500 कोटी रुपये वसूल केले आहेत. बँकेत मिनिमम बॅलेन्सच्या नावाने हे पैसे सरकारने घेतल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या श्रीमंत मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज लगेच माफ करतात, पण गरीबांवर दंडाचा चाबूक उगारायला विसरत नाही. जनतेला महागाई, बेरोजगारी आणि वसूलीच्या चक्रव्युहात अडकवणाऱ्या मोदी सरकारला याचे जोरदार प्रत्युत्तर मिळेल. देशाची जनता मोदी सरकारचा हा चक्रव्युह नष्ट करेल असेही काँग्रेसने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;