मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले, काँग्रेसचा गंभीर आरोप
मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी आपल्या उद्योजक मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज सहज माफ करतात असेही काँग्रेसने म्हटले आहे.
मोदी सरकार ने गरीब जनता से 5 साल में 8,500 करोड़ रुपए वसूल लिए।
कारण- बैंक खातों में मिनिमम बैलेंस न रख पाना।
नरेंद्र मोदी अपने अमीर दोस्तों के लाखों-करोड़ों का कर्ज यूं ही माफ कर देते हैं, लेकिन गरीबों पर जुर्माने का चाबुक चलाना नहीं भूलते।
जनता को महंगाई, बेरोजगारी और…
— Congress (@INCIndia) July 30, 2024
काँग्रेसने एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट लिहून म्हटले आहे की मोदी सरकारने गरीब जनतेकडून 5 वर्षात 8 हजार 500 कोटी रुपये वसूल केले आहेत. बँकेत मिनिमम बॅलेन्सच्या नावाने हे पैसे सरकारने घेतल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या श्रीमंत मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज लगेच माफ करतात, पण गरीबांवर दंडाचा चाबूक उगारायला विसरत नाही. जनतेला महागाई, बेरोजगारी आणि वसूलीच्या चक्रव्युहात अडकवणाऱ्या मोदी सरकारला याचे जोरदार प्रत्युत्तर मिळेल. देशाची जनता मोदी सरकारचा हा चक्रव्युह नष्ट करेल असेही काँग्रेसने म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List