गुजरातचा साबरमती प्रकल्प कॉपी-पेस्ट केल्यामुळेच पुणे उद्ध्वस्त होतंय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

गुजरातचा साबरमती प्रकल्प कॉपी-पेस्ट केल्यामुळेच पुणे उद्ध्वस्त होतंय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

‘पुण्यातील नियोजनशून्यतेमुळे पूर येऊन शहर उद्ध्वस्त झाले आहे. सत्ताधारी आणि बिल्डर लॉबी यांची अभद्र युती या पुराला जबाबदार आहे. साबरमती नदीकाठचा प्रकल्प गुजरातमधील आर्किटेक्टच्या माध्यमातून पुण्यात कॉपी-पेस्ट करण्यात आला आणि पुणे उद्ध्वस्त केले,’ असा हल्लाबोल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला.

पुण्याला गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुजरातमधील साबरमती नदीकाठी केलेल्या प्रकल्पाच्या धर्तीवर भाजपने पुण्यात तसाच प्रयत्न केला. मुळा-मुठा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली नद्यांमध्ये भराव टाकून सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद केले आहे. त्यामुळे पुण्यात हा पूर आल्याची टीका होत आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘ पुण्यातील नदीचा प्रवाह लक्षात न घेता हा प्रकल्प आखण्यात आल्याने हा पूर आला आहे. पुण्यातील नदीकाठचा प्रकल्प हा आंधळेपणाने तयार केलेला प्रोजेक्ट आहे. पर्यावरण मंत्री असताना मी हा प्रोजेक्ट थांबवून पुन्हा संपूर्ण प्रोजेक्टची आखणी करण्यास सांगितली होती. मात्र आमचे सरकार पाडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पुणे महापालिका आणि मिंधे सरकार या प्रोजेक्टला पाठिंबा देत आहेत. पुण्यातील अनेक शहरे विकासकांनी व आर्किटेक्टनी याविरोधात आवाज उठविला आहे. मीदेखील आवाज उठवलाय. हा प्रोजेक्ट पुण्यासाठी अडचणीच निर्माण करणार आणि यंदाच्या पुराच्या माध्यमातून आपण त्याचे परिणाम पाहिलेच आहेत. नदीकाठची बांधकामे ही तत्काळ थांबविली पाहिजेत. नद्या स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. डेब्रिज नद्यांमध्ये टाकून त्या नदीचे काँक्रीटीकरण पिंवा काँक्रीटचे डबके बनवायचे नाही,’ असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;