सरकारी यंत्रणांची बेफिकिरी सामान्यांच्या जीवावर बेततेय; राहुल गांधींनी फटकारले!

सरकारी यंत्रणांची बेफिकिरी सामान्यांच्या जीवावर बेततेय; राहुल गांधींनी फटकारले!

राजधानी नवी दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर परिसरात कोचिंग क्लासच्या तळमजल्यावर पाणी भरल्याने तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सुरक्षित आणि आरामदायी जीवन प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तसेच सरकारची जबाबदारी आहे. मात्र वास्तवात सरकारी यंत्रणांच्या बेजबाबदार कारभारामुळे सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

दिल्लीच्या दुर्घटनेनंतर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान राहुल गांधी यांनीही दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

राहुल गांधी यांची सोशल मीडियातील पोस्ट

राजधानी दिल्लीतील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया नोंदवतानाच राहुल गांधी यांनी सरकारी यंत्रणांच्या बेजबाबदार कारभारावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘दिल्लीतील एका इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी पावसातच आणखी एका विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

पायाभूत सुविधांचा विस्कळीतपणा हे व्यवस्थेचे एकत्रित अपयश आहे. असुरक्षित बांधकाम, निकृष्ट नगरनियोजन तसेच सरकारी यंत्रणांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिक स्वतःचा जीव गमावून चुकवत आहेत. सुरक्षित आणि सुखसुविधांयुक्त जीवन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तसेच सरकारची जबाबदारी आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;