सत्ता बदलताच 24 तासांत अग्निवीर योजना बंद करू

सत्ता बदलताच 24 तासांत अग्निवीर योजना बंद करू

देशाच्या सुरक्षेशी समझोता करणारी आणि सैनिकांच्या भविष्याचा खेळ करणारी अग्निवीर योजना केंद्रात सत्ता बदल होताच रद्द करू, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला. जुन्या पद्धतीने तरुणांना लष्करात भरती करायला हवे, अशी जोरदार मागणीही त्यांनी एक्सवरून केली.

अखिलेश यादव यांनी अवधेश सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत ही घोषणा केली. या व्हिडीओत अवधेश सिंह बोलताना दिसत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र म्हणतात अग्निवीर योजनेवरून विरोधी पक्ष चुकीची माहिती पसरवत आहेत. परंतु, खरी परिस्थिती ही आहे की, सुरुवात त्यांनीच केली आहे. केवळ चार वर्षांसाठी अशी व्यवस्था कोणीच केली नव्हती. ही त्यांनीच केली आहे. अग्निवीर योजनेमुळे तरुणांचे मनोधैर्य खचले आहे. तरुणांच्या मनात सध्या एकच विचार सुरू आहे. चार वर्षं संपल्यानंतर त्यांचा इन्कम सोर्स काय असेल. या व्हिडीओत अवधेश सिंह बोलत आहेत की, केंद्रात आपले सरकार आल्यास अवघ्या 24 तासात अग्निवीर योजना बंद करण्यात येईल. आपला शब्द कधीच इकडे तिकडे होत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;