मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका, नंदुरबारमध्ये रेल्वेरुळांवर पाणी साचले, दोन तासांपासून वाहतूक ठप्प
गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने नंदुरबार जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली तरी सकल भागात पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे सूरत-भुसावळ रेल्वे सेवा गेल्या दीड ते दोन तासांपासून ठप्प झाली आहे. कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरुन पाणी वाहत असल्याने रेल्वेची वाहतूक बंद पडली आहे. यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास झाला आहे.
नंदुरबार मार्गावरुन जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे सेवा कधी पूर्ववत होणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यामुळे रेल्वे प्रवाशी रस्ते वाहतुकीचा पर्याय अवलंबताना दिसत आहेत.
दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेला कर्मचाऱ्यांकडून वाट दाखवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List