सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… यासाठी ऐश्वर्या राय काय करते? जपते फार जुनी परंपरा

सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… यासाठी ऐश्वर्या राय काय करते? जपते फार जुनी परंपरा

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या खासगी आयुष्याच्या तुफान चर्चा रंगल्या आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील कोणत्याच प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा ऐश्वर्या आणि लेक आराध्या बच्चन यांना बच्चन कुटुंबियांपासून वेगळं स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे बच्चन कुटुंबात वाद सुरु आहेत.. अशा चर्चांनी जोर धरला. दरम्यान, ऐश्वर्या राय सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी पालन करत असलेल्या जुन्या परंपरेची देखील चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्याच्या बोटात एक अंगठी कायम दिसते. ऐश्वर्या राय कायम ‘व्ही’ आकाराची अंगठी घालते. ज्यामागे एक परंपरा आहे. ऐश्वर्या घालत असलेल्या अंगठीला वडुंगिला किंवा वेंकी असं देखील म्हणतात. ही एक पारंपारिक अंगठी आहे आणि कर्नाटकातील विवाहित स्त्रिया, विशेषतः तुळूमध्ये घातला जाणारा हा पारंपरिक दागिना आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

 

सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… याचं प्रतीक ‘व्ही’ आकारची अंगठी असते… असं मानलं जातं. तुलुनाडूमध्ये स्त्रिया लग्नानंतर ही अंगठी कायम घालतात. मात्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्येही याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते… असं देखील सांगितलं जातं.

 

 

ऐश्वर्या राय ही बंट समाजातील आहे. जो मातृसत्ताक प्रणालीचं पालन करतो. शिवाय ‘व्ही’ आकाराची अंगठी विवाहीत महिलांचं वाईट गोष्टींपासून रक्षण करते… अशी देखील मान्यता आहे… यावर पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

एक नेटकरी म्हणाला, ‘ही अंगठी दोघांच्या नात्याला वाचवू शकते…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सर्व वाईट गोष्टींपासून त्याचं रक्षण होवो…’ सध्या चाहत्यांमध्ये ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;