Mumbai Rain: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; पाणी कपात होणार रद्द
>> देवेंद्र भगत, मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात मिळून 67 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तलाव क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने मुंबईत 5 जून पासून सुरू असलेली 10 टक्के पाणी कपात सोमवार 29 जुलै पासून रद्द करण्यात करण्याचा विचार सुरू असल्याचे पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा जून महिन्यात पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची जोरदार इनिंग सुरू झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
ताज्या बातम्या आणि जलद अपडेटसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List