कोल्हापुराला महापुराची भीती कायम, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; पंचगंगेनेही धोका पातळी ओलांडली

कोल्हापुराला महापुराची भीती कायम, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; पंचगंगेनेही धोका पातळी ओलांडली

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे धुमशान सुरू असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहराला पाण्याने वेढा घातला असून कोल्हापुरालाही महापुराची भीती कायम आहे. गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी नऊच्या सुमारास पंचगंगा नदीने 43 फुटांची धोका पातळी गाठली. पाठोपाठ राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

राधानगरी धरण शंभर टक्के भरल्याने गुरुवारी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.

धरणातून सध्या 2 हजार 928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या पावसात राधानगरी धरण भरल्यानंतर प्रथमच स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना महापुराची भीती कायम राहिली आहे.

दरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसण्यास कारणीभूत असलेल्या कर्नाटकातील 91.263 टीएमसी क्षमतेच्या अलमट्टी धरणातून सध्या 2 लाख क्युसेक विसर्ग होत आहे.

ऐतिहासिक कळंबा तलाव ओसंडला,पाणी सांडव्या बाहेर

शहराची गेली 141 वर्षे अखंडितपणे तहान भागवणारा शाहूकालीन ऐतिहासिक कळंबा तलाव यंदाच्या पावसात प्रथमच बुधवारी सकाळी पाणी सांडव्यातून बाहेर पडला. कळंबा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे अवघ्या सात दिवसातच हा तलाव पूर्णक्षमतेने भरला. कोल्हापूर महानगरपालिके तील 25 टक्के शहरी भाग तसेच संपूर्ण कळंबा गावाला या तलावातून पाणीपुरवठा केला जात असल्याने येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न बहुतांशी सुटल्याने नागरिक व प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;