केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत लोकांचे ब्लॅकमेलिंग सुरू, प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद

केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत लोकांचे ब्लॅकमेलिंग सुरू, प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद

बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) केल्या जाणाऱया अटकेच्या कारवाईवर ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात तीव्र आक्षेप घेतला. यूएपीए कायद्याचा निव्वळ गैरवापर सुरू आहे. या कायद्याच्या माध्यमातून एनआयएसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा लोकांना ब्लॅकमेलिंग करताहेत, लोकांना संशयावरून उचलून तुरुंगात डांबले जातेय, असा युक्तिवाद अॅड. आंबेडकर यांनी केला.

यूएपीए कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देत अनिल बैले यांनी अॅड. संदेश मोरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यातर्फे युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयाने पेंद्र सरकारची बाजू ऐकण्यासाठी 7 ऑगस्टला पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;